अध्यात्म आणि हवामान बदल : यांत काही संबंध आहे का?* भाजून काढणारी उष्णतेची लाट, जंगलातील वणवे आणि विनाशकारी पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती म्हणजे पृथ्वीचा एक तातडीचा इशारा असल्याचे वाटते ! जागतिक नेत्यांच्या प्रयत्नांनंतरही, पर्यावरणाची स्थिती बिघडत चालली आहे. या संकटामागील एखाद्या सखोल कारणाकडे आपण दुर्लक्ष

_

दिनांक : ६.६.२०२६

*अध्यात्म आणि हवामान बदल : यांत काही संबंध आहे का?*
भाजून काढणारी उष्णतेची लाट, जंगलातील वणवे आणि विनाशकारी पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती म्हणजे पृथ्वीचा एक तातडीचा इशारा असल्याचे वाटते ! जागतिक नेत्यांच्या प्रयत्नांनंतरही, पर्यावरणाची स्थिती बिघडत चालली आहे. या संकटामागील एखाद्या सखोल कारणाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत का?

*याचे मूळ कारण अध्यात्मात तर दडलेले नाही ना?*
अध्यात्मशास्त्रानुसार, विश्वातील प्रत्येक वस्तू सूक्ष्म स्पंदने प्रक्षेपित करते, जी ‘त्रिगुणांनी’ – सत्त्व, रज आणि तम यांनी प्रभावित असतात. करुणा आणि प्रामाणिकपणा यांसारखे गुण ‘सत्त्व’ वाढवतात, तर लोभ, द्वेष आणि स्वार्थ ‘रज-तम’ वाढवतात, ज्यामुळे ‘आध्यात्मिक प्रदूषण’ निर्माण होते. हेच आध्यात्मिक असंतुलन ‘पंचमहाभूतांचे’ (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) संतुलन बिघडवून नैसर्गिक आपत्तींना जन्म देते.

*निसर्गाचे चक्र आणि मानवी वर्तन*
प्राचीन भारतीय ग्रंथ ‘चरक संहिता’ मध्ये वर्णन केलेल्या युग चक्रांनुसार, सध्याचे ‘कलियुग’ आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात नीचांकी स्तरावर आहे, जिथे सामूहिक अधर्म हे हवामानातील बिघाडांचे प्रमुख कारण आहे.

MAV च्या संशोधकांना असे आढळून आले आहे की ९८% पर्यावरणीय बदल याच चक्रीय बदलांमुळे होतात, आणि नैसर्गिक आपत्ती या निसर्गाद्वारे आध्यात्मिक संतुलन पुनर्स्थापित करण्याचे एक माध्यम आहेत.

*पर्यावरणाच्या सूक्ष्म स्पंदनांवरील संशोधन*
*MAV च्या संशोधकांनी ३२ देशांतून गोळा केलेल्या माती आणि पाण्याच्या १,००० नमुन्यांचा ‘ऑरा मीटर’ आणि ‘एनर्जी स्कॅनर’द्वारे अभ्यास केला. याचे निष्कर्ष धक्कादायक होते :*

*१*. भारताबाहेरील ८३% पेक्षा जास्त नमुन्यांमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होताना आढळली, ज्यामध्ये एका वर्षात नकारात्मकता ५००% पर्यंत वाढली.

*२.* भारतातील ६५% पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये सकारात्मक स्पंदने होती. भौतिकदृष्ट्या प्रदूषित नद्यादेखील ६ मीटरपर्यंतची सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करतांना आढळल्या.

*३.* आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र ठिकाणांनी (मंदिरे/आश्रम) आणि तेथील वनस्पतींनी उच्च सकारात्मकता दर्शवली.

संशोधक या फरकाचे कारण भारतातील आध्यात्मिकता, शाकाहार आणि संतांची उपस्थिती असल्याचे मानतात. याउलट, भौतिकवाद आणि साधनेचा अभाव पर्यावरणाला नकारात्मक ऊर्जेने भरून टाकतो. परिणामी सूक्ष्म आणि शक्तिशाली नकारात्मक ऊर्जा निर्माण होतात आणि मानवजातीवर नकारात्मक प्रभाव पाडतात. हे प्रगत अशा सहाव्या ज्ञानेंद्रियाचा (सिक्स्थ सेन्स) वापर करून एका साधकाने काढलेल्या सूक्ष्म चित्रावरून समजून घेता येते.

*साधना: पर्यावरण शुद्धीवरील उपाय !*

MAV च्या संशोधनावरून हे सिद्ध झाले आहे की नामजप, यज्ञ आणि सात्त्विक जीवनशैली यांसारख्या साधना केवळ मनुष्याचे सप्तचक्र आणि ऊर्जा-क्षेत्रच शुद्ध करत नाहीत, तर त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातही सकारात्मक स्पंदने वाढवतात. सध्याच्या काळात संतांनी विशेषतः “श्री राम जय राम जय जय राम” हा नामजप करावा असे मार्गदर्शन केले आहे.

हा दृष्टिकोन एक नवी दिशा देतो – जर मानवी विचार आणि कृतींमध्ये प्रदूषण असू शकते, तर पर्यावरणाची शुद्धी देखील अंतर्गत आध्यात्मिक परिवर्तन आणि सामूहिक चेतनेतील वाढीनेच केली जाऊ शकते !

*संकलक: श्री. शॉनक्लार्क,* संशोधनगट प्रमुख, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें